पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं- नितीन गडकरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित औद्योगिक कार्बनउत्सर्जन या विषयावर आधारित परिषदेत ते बोलत होते. आपल्याला देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. त्याबरोबरंच पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. सध्या हरित हायड्रोजनचा जास्तित जास्त वापर वाढावा यावर केंद्र सरकारचा भर आहे. तसंच बायोतंत्रज्ञानाचा वापर करुन बायोमासचं उत्पादन वाढवण्यावर भर द्यायला हवा, बायोमास वापरुन आपण बायो- इथनॉल, बायो एलएनजी, बायो सीएनजी तयार करू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image