पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं- नितीन गडकरी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित औद्योगिक कार्बनउत्सर्जन या विषयावर आधारित परिषदेत ते बोलत होते. आपल्याला देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. त्याबरोबरंच पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. सध्या हरित हायड्रोजनचा जास्तित जास्त वापर वाढावा यावर केंद्र सरकारचा भर आहे. तसंच बायोतंत्रज्ञानाचा वापर करुन बायोमासचं उत्पादन वाढवण्यावर भर द्यायला हवा, बायोमास वापरुन आपण बायो- इथनॉल, बायो एलएनजी, बायो सीएनजी तयार करू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.