जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नसल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नाही, असं परखड मत आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत व्यक्त केलं. राष्ट्रपती निवासात जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाशी संवाद साधताना ते बोलत होते.

राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि एकात्मता याचं रक्षण जनतेनं करायलाच हवं, असं ते म्हणाले. द्वेष आणि असहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे भाग नाहीत, असंही ते म्हणाले. भारत सर्वात मोठी संसदीय लोकशाही असून सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाचा पाठपुरावा करतो असंही त्यांनी सांगितलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image