एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात, बंडाचा झेंडा उभारुन आधी सुरतमध्ये मुक्काम केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तत्पूर्वी काल ते आपल्या समर्थकांसह गुजरातमध्ये सुरत इथं मुक्कामी होते. या घडामोडीनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत पक्षाचे ५५ पैकी १४ आमदार उपस्थित होते. पक्षांतर-विरोधी कायद्याला बगल देण्यासाठी शिंदे यांना ५५ पैकी दोन-तृतियांश म्हणजे ३७ सेना आमदारांचा पाठिंबा आवश्यक राहील. दरम्यान मुंबईतील उर्वरित शिवसेना आमदारांना लोअर परळ इथल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीला संबोधित करणार आहेत. सध्या राज्यात उद्भवलेला पेचप्रसंग भाजपनं इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस यंत्रणा, इडीच्या धाडी यांचा वापर करून पूर्वनियोजित पद्धतीनं घडवून आणला आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.