UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून त्यानंतर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस UPSC नं केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी १८०, परराष्ट्र सेवेसाठी ३७ आणि पोलिस सेवेसाठी २०० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी जानेवारी मुख्य परीक्षा आणि एप्रिल-मे महिन्यात मुलाखती झाल्या होत्या.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image