नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून त्यानंतर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस UPSC नं केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी १८०, परराष्ट्र सेवेसाठी ३७ आणि पोलिस सेवेसाठी २०० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी जानेवारी मुख्य परीक्षा आणि एप्रिल-मे महिन्यात मुलाखती झाल्या होत्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.