नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या - राज ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला. ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी त्यांनी केली.

औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येतं. तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या, ऊसाचा प्रश्न याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. राज्यात सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं.एमआयएमला मोठं करण्याचं राजकारण करण्यात आलं, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image