नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या - राज ठाकरे
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला. ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी त्यांनी केली.
औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येतं. तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या, ऊसाचा प्रश्न याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. राज्यात सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं.एमआयएमला मोठं करण्याचं राजकारण करण्यात आलं, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.