रायगड जिल्ह्यात घोणसे घाटात झालेल्या अपघातात तीन ठार, २५ जखमी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातल्या घोणसे घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. हे सर्वजण म्हसळा तालुक्यातल्या धनगर मलई परिसरातले, पण मुबंईला राहणारे असून एका कार्यक्रमासाठी आपल्या गावाला जात असताना घाटात त्यांची बस दरीत कोसळली.

परिसरातल्या लोकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. म्हसळा पोलिसही घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींवर म्हसळा इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना माणगाव इथल्या रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितहलवलं आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून, अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image