सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग - राजनाथ सिंग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत सीमा रस्ते संघटनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील असं त्यांनी सांगितलं.

गेल्या काही वर्षात उत्तर क्षेत्रात चीनची घुसखोरी वाढल्यानं सीमा रस्ते संघटनेनं आपलं काम सुरू ठेवत तंत्रज्ञानाच्या सहकार्यांनं आपली क्षमता वाढवण गरजेचं असल्याचा सिंग म्हणाले.

या  अर्थसंकल्पात सीमा रस्ते संघटनेच्या तरतुदीत चाळीस टक्क्यांनी वाढ करत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ते साडेतीन हजार कोटी रुपये केल्याची माहिती सिंग यांनी यावेळी दिली. सरकारचा देशाच्या सुरक्षेला आणि सीमा भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार सिंग यांनी यावेळी केला.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image