देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

काळाच्या गरजेनुसार तंत्र आणि उद्दिष्टांमधे बदल करुन संशोधनाची व्याप्ती वाढवली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. वैज्ञानिक दृष्टीकोन साध्या सोप्या शब्दात शेतकऱ्यांमधे रुजवला पाहिजे असंही ते म्हणाले. या अभ्यासक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींनी पदकं प्रदान केली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image