देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

काळाच्या गरजेनुसार तंत्र आणि उद्दिष्टांमधे बदल करुन संशोधनाची व्याप्ती वाढवली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. वैज्ञानिक दृष्टीकोन साध्या सोप्या शब्दात शेतकऱ्यांमधे रुजवला पाहिजे असंही ते म्हणाले. या अभ्यासक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींनी पदकं प्रदान केली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image