साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. साखर निदेशालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग यांच्या सहमतीनं ही निर्यात केली जाणार आहे. येत्या एक जून पासून ३१ ऑक्टोबर पर्यंत हा आदेश लागू असेल,असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. या निर्णायामुळे साखर हंगामाच्या अखेरपर्यंत ६० ते ६५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, हा साठा दोन ते तीन महिने घरगुती वापरासाठी उपयोगी होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.