आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. नऊ हजार मेट्रिक टन तांदूळ, दोनशे टन दूध भुकटी आणि 24 टन अत्यावश्यक औषधे असं साहित्य पाठवण्यात आलं आहे.आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेतील जनतेच्या मदतीसाठी तामिळनाडू सरकारनं  40 हजार मेट्रिक टन तांदूळ, पाचशे मेट्रिक टन दुधाची पावडर आणि जीवरक्षक औषधे जमा केली असून, यातील थोडं साहित्य काल पहिल्या टप्प्यात कोलंबोला पाठवण्यात आलं. लोकांकडून यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान मिळत आहे.

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image