जल जीवन मिशनमुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन  मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला असून हे जनतेच्या आकांक्षा आणि जन आंदोलनाचं उदाहरण आहे, असंही त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे. पेय जल सुविधा देशातल्या १७ लाख शाळा आणि अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचली आहे. जल जीवन अभियानाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी ४० लाख कुटुंबाना नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image