राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल  कोविड-१९ च्या ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७५ हजार २११ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २६ हजार ६६३ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४७ हजार ८१६ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, जळगाव, नंदुरबार, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, आणि चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image