२०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट - केंद्रीय आरोग्यमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून हिवताप आणि क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती आराखडा आखत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जागतिक हिवताप दिनाच्यानिमित्तानं नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. वर्ष २०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त आणि २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 

देशात हिवतापाच्या रुग्णांच्या प्रमाणात ८६ टक्के घट झाली असून २०१५ च्या तुलनेत हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात ७९ टक्क्यांनी घट झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.  हिवतापावर लस निर्मितीसाठी देशात प्रयत्न सुरु असून  लवकरच स्वदेशी लस तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  परजीवी कीटकांपासून पसरणाऱ्या रोगांबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती करणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित होत्या. 

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image