किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचा आजपासून आरंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आजपासून 'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी' या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबवली जाणार आहे. यात एक कोटीहून अधिक शेतकरी सहभागी हॉटेल असा अंदाज आहे.

सामायिक सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ‘पीकविम्या’वरील देशव्यापी कार्यशाळेचा शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर करणार असून या अंतर्गत आयोजित राष्ट्रीय आत्मनिर्भर भारत संमेलनात ७५ निवडक शेतकरी आणि आणि उद्योजक सहभागी होतील.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांतील कृषी विकासाचे टप्पे तसच हरित क्रांती आणि अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णतेवर या मोहिमेत भर दिला जाईल. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रावर कृषी मेळावा आणि नैसर्गिक शेतीवरील प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image