लोकसहभागामुळेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली - नरेंद्र मोदी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. ही घरं मूलभूत सुविधांनी सज्ज आहेत आणि महिला सक्षमीकरणाचं प्रतिक बनली आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. या कामगिरीमुळे देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं सरकारनं एक महत्त्वाचा पल्ला गाठला असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशात ग्रामीण भागासाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत २ कोटी ५२ लाख, तर शहरी भागाच्या योजनेअंतर्गत ५८ लाखाहून अधिक पक्की घरं बांधली आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.