घर विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची गरज नसल्याची गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल किंवा घर भाड्यावर द्यायचं असेल, तर तो रहात असलेल्या सोसायटीची परवानगीची आवश्यकता नाही, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. घर मालकाला स्वतःच्या घराचा हक्क आहे. त्याला ते घर कोणाला विकावं हा त्याचा निर्णय आहे. घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, असंही आव्हाड म्हणाले. काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात. विशिष्ठ जाती समुदाय किंवा शाकाहारी लोकं शाकाहारींनाच विकतात. त्यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे. मुंबई ही एकत्र राहायला हवी, यासाठी हा प्रयत्न आहे, असंही आव्हाड यांनी सांगितलं. तसंच, 'एखाद्या घरमालकानं त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्या, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तपास करतात, असंही त्यांनी स्पष्ट कलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image