राज्यात काल कोरोनाच्या २ हजाराहून कमी रुग्णांची नोंद
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ११ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ४४ हजार ९१५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७६ लाख ६१ हजार ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १ लाख ४३ हजार ४१६ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३६ हजार ४४७ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६६ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ८ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ३ हजार ९९४ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ३३४ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत काल कोविड-१९ चे १९२ नवे रुग्ण आढळले. तर ३५० रुग्ण बरे झाले. मुंबईत आतापर्यंत १० लाख ३२ हजार १८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्तीचा दरर ९८ टक्के आहे. मुंबईत सध्या २ हजार ५१३ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्णवाढीचा दर ४ शतांश टक्के आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी १ हजार ६९१ दिवसांवर गेला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.