वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सुर्यकुमार यादवनं ६४, तर के एल राहुलनं ४९, धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला निर्धारित ५० षटकात ९ बाद २३७ धावा करता आल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ४६ व्या षटकात १९३ धावांवर गारद झाला. प्रसिद्ध कृष्णानं ४ गडी बाद केले. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.