एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध - नरेंद्र मोदी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज एक महासागर परिषदेला संबोधित करत होते. किनारी भागात प्लास्टिक आणि इतर वस्तूंचा कचरा साफ करण्यासाठी भारतानं नुकतीच राष्ट्रव्यापी जागृती मोहिम चालवली. त्यात ३ लाख लोकांनी सुमारे १३ टन प्लास्टीक कचरा गोळा केला, असं त्यांनी सांगितलं.
भारतात सागरी संस्कृती पूर्वापासून आहे. आणि आज आपली सुरक्षा आणि समृद्धी महासागराशी जोडलेली आहे. भारताच्या “भारत-प्रशांत महासागर पुढाकारात” सागरी संसाधनं हा प्रमुख स्तंभ आहे. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टीकबाबत जागतिक मोहिम सुरु करण्यात फ्रान्ससोबत सहभागी व्हायला आम्हाला आनंदचं होईल, असं मोदी म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.