युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे.
युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटनने बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आणीबाणीच्या सत्रादरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या वादावर शांतपणे आणि विधायकरीत्या विचार करून उपाय शोधणं ही काळाची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस थिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितलं. व्यापक हित लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचा भंग होईल असं कृत्य करणं टाळायला हवं, असं ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.