रायगड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनं बाधित गावांसाठी १३ कोटींहून अधिक रुपयांचा निधी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानं बाधित झालेल्या, रायगड जिल्ह्यातल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. २२ आणि २३ जुलै २०२१ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात तळीये, कोंडाळकरवाडी, बौध्दवाडी, केवनाळे, तर पोलादपूर तालुक्यात साखर -सुतारवाडी, ही गावं बाधित झाली होती. तसंच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी भुसंपादन, नागरी आणि सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा, जल जीवन इत्यादि कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.