रायगड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनं बाधित गावांसाठी १३ कोटींहून अधिक रुपयांचा निधी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानं बाधित झालेल्या, रायगड जिल्ह्यातल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. २२ आणि २३ जुलै २०२१ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात तळीये, कोंडाळकरवाडी, बौध्दवाडी, केवनाळे, तर पोलादपूर तालुक्यात साखर -सुतारवाडी, ही गावं बाधित झाली होती. तसंच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी भुसंपादन, नागरी आणि सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा, जल जीवन इत्यादि कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image