नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे

मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. एपीएमसी प्रशासनाच्या पुढाकाराने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला.

या बैठकीत माथाडी कामगारांनी ५३ किलोपर्यंतच्या गोणी उतरवायला मान्यता दिली आहे. तसंच ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी मागवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचं  आश्वासन बाजार समिती प्रशासनानं दिलं आहे.

कांदा बटाटा मार्केटमध्ये संपूर्ण देशभरातून मालाची आवक होत असते, काहीवेळा ६० किलोपर्यंत वजनाच्या गोणी असतात. माथाडी कामगारांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्यानं  ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलायला माथाडी कामगारांनी नकार दिला होता.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image