भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात वेस्टइंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. सुर्यकुमार यादवनं केलेल्या ६५ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारतानं विंडीजसमोर विजयासाठी १८५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्टइंडिज निर्धारीत २० षटकांमध्ये ९ गडी बाद १६७ धावाच करू शकला. वेस्टइंडिजच्या वतीनं निकोलस पुरन यानं मालिकेतलं सलग तीसरं अर्धशतक झळकावत ६१ धावा केल्या. भारताच्या सुर्यकुमार यादव याला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवलं केलं. या मालिका विजयामुळे आयसीसीच्या टी.ट्वेंटी क्रमवारीत भारत इंग्लंडला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोचला आहे. याआधी २०१६ मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा अव्वल स्थानी पोचला होता.

 

 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image