प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. सरन्यायाधीश एन. व्ही रमण, न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या पिठासमोर या प्रकरणी एका संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी हा निर्णय देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये फिरोझपूर इथं झालेल्या निदर्शनामुळे त्यांचं पथक एका पुलावर अडकलं होतं. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image