राज्यात नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. राज्यात काल ४३ हजार ६९७ नवे रुग्ण आढळले, ४६ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या २ लाख ६४ हजार ७०८ एक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ४ दशांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ९३ शतांश टक्के आहे.राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले २१४ रुग्ण आढळले. त्यापैकी १५८ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात, पुणे ग्रामीण १०, मुंबई ३१, कल्याण-डोंबिवली आणि पिंपरी चिंचवड प्रत्येकी ४, परभणी २, तर नाशिक, वसई विरार, औरंगाबाद, जळगाव आणि इतर राज्यातला असे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत २ हजार ७४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १ हजार ९१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image