नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबईत नवे निर्बंध लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार संध्याकाळी ५ ते सकाळी ५ दरम्यान समुद्र किनारे, मैदानं, बगिचे आणि यासारख्या इतर सार्वजनिक ठिकाणानांना नागरिकांना भेटी देता येणार नाहीत. सर्व प्रकारचे लग्न समारंभ, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रमांना ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. अंत्यसंस्कारालाही जास्तीत जास्त २० जणांना उपस्थित राहता येईल. आज दुपारपासून १५ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध मुंबईत लागू राहतील.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image