राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. शून्य प्रहरातलं कामकाज चालवण्याचा प्रयत्न अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू करत असताना विरोधी सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत निलंबन मागं घेण्याची मागणी केली. शून्य प्रहरातलं कामकाज महत्वाचं असल्यानं ते चालू द्यावं, असं आवाहन नायडू यांनी या सदस्यांना केलं. मात्र, गोंधळ चालूच राहिल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, तर नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.