बियाणं आणि कीटकनाशकांची भेसळ रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा विकसित करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणं आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, यासाठी त्याचं ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित केली जात असून, त्यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.  या संदर्भात काल सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत ते  बोलत होते. बी-बियाणं आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादनं दर्जेदार असावीत. त्याची देखरेखही या यंत्रणेमार्फत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी सहसचिव गणेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image