बियाणं आणि कीटकनाशकांची भेसळ रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा विकसित करणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणं आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, यासाठी त्याचं ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित केली जात असून, त्यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या संदर्भात काल सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बी-बियाणं आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादनं दर्जेदार असावीत. त्याची देखरेखही या यंत्रणेमार्फत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी सहसचिव गणेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.