नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय  मानवी हक्क आयोगानं केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस पाठवली आहे. घडलेल्या घटनेची विस्तृत माहिती ६ आठवड्याच्या आत कळवावी असं आयोगानं या नोटिशीत म्हटलं आहे. नागालँडमध्ये सैन्यदलाकडून सामान्य नागरिकांवर झालेल्या गोळीबाराच्या प्रसारमाध्यमातल्या  बातम्यांची दाखल घेत मानवी हक्क आयोगानं ही नोटीस जारी  केली आहे. दरम्यान, नागालँडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात साजरा  होणारा  हॉर्नबिल महोत्सव रद्द  करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image