संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारताकडे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. सुमारे 10 वर्षानंतर भारताकडे हे अध्यक्षपद आलं आहे. अमेरिकेत 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, 28 सप्टेंबर 2001 रोजी सुरक्षा परिषदेनं एक ठराव करून दहशतवाद विरोधी समितीची स्थापना केली होती. या ठरावानुसार सर्व देशांना दहशतवाद रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image