कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही - मनसुख मांडविया
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान फेटाळून लावला. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले की, याविषयी पंजाब वगळून इतर अनेक राज्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या उत्तरांनुसार ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पंजाबमध्ये मात्र यासंबंधीची चार संशयित प्रकरणं आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेच्या मुद्द्याला नाहक राजकीय वळण दिलं जात आहे. यावेळी कोविड१९च्या दुसऱ्या लाटेच्या काळात देशाच्या ऑक्सिजन उत्पादन क्षमता आणि संबंधित व्यवस्थेत मोठी वाढ झाली असंही मांडवीय यांनी यावेळी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.