संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला- राष्ट्रपती
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेच्या लोकलेखा समितीच्या शताब्दी महोत्सवाला संबोधित करत होते. सार्वजनिक जीवन निर्मळ असावं यासाठी व्यवहारांची नोंद महत्वाची असल्याचं महात्मा गांधी यांचं मत होतं असंही राष्ट्रपतींनी अधोरेखीत केलं. उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकलेखा समीतीच्या अहवालांतून व्यवस्थेत नियमीतपणे सुधारणा केल्या जातात. आजवर समीतनं अनेक आर्थिक त्रूटींचा शोध लावून त्या सुधारण्याचं काम केलं आहे असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. एका वर्षात संसेदेत किमान १०० दिवसांचं कामकाज व्हायला हवं असंही नायडू यांनी यावेळी सुचवलं. लोकलेखा समिती ही संसदेचा सर्वात महत्वाचा घटक असून, समितीच्या सदस्य समर्पण वृत्तीनं काम करत आहेत अशा शब्दांत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.