राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात दिली. महिला अत्याचाराचे राज्यात ३० हजार ५४८ गुन्हे दाखल झाले. अनेक घटनांमध्ये परिचितांकडूनच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. यापुढे अत्याचार करण्याचे धाडसच‌ कुणी करु नये, अशी‌ कडक‌‌ तरतूद शक्ती विधेयकात केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७ हजार १८७ गुन्हे दाखल झाले. तसंच ८३३ जणांना अटक करण्यात आली आहे, असं ते म्हणाले. पेपरफुटी प्रकरणाबाबत विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय देण्यात येईल. पोलिसांच्या बदल्यांबाबत संपूर्ण पारदर्शकता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यात जुन्या आणि  मोडकळीस आलेल्या ७५ पोलिस ठाण्याच्या नवीन इमारती उभारल्या जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री यांनी यावेळी केली. तसेच राज्यात १० नवीन पोलीस स्टेशन आणि ९०६ पदे नव्याने निर्माण करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image