राज्यात नवे निर्बंध लादण्याचा निर्णय २ दिवसात घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाविषयी निर्णय घेऊ, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. राजधानी दिल्लीमध्येही रुग्ण संख्या वाढल्यामुळे तिथले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही निर्बंध कडक करायचे का यासंदर्भात ही चर्चा असेल, असं ते म्हणाले. राज्यात ८७ टक्के लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून ५७ टक्के लोकांनी लसीची दुसरी मात्राही घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईतला पॉझिटीव्हीटी दर ४ टक्क्यावर आला असला, तरी नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image