भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून केलं आहे. दरम्यान लसीकरण मोहीमेच्या आज ३२५ व्या दिवशी भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. देशभरात आज दुपारपर्यंत ३४ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२८ कोटी ३० लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४७ कोटी ८७ लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही आज दुपारपर्यंत लसींच्या ४ लाखांहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरातल्या लाभार्थ्यांना एकूण ११ कोटी ८६ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४ कोटी २६ लाखाहून अधिक नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image