भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून केलं आहे. दरम्यान लसीकरण मोहीमेच्या आज ३२५ व्या दिवशी भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. देशभरात आज दुपारपर्यंत ३४ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२८ कोटी ३० लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४७ कोटी ८७ लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही आज दुपारपर्यंत लसींच्या ४ लाखांहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरातल्या लाभार्थ्यांना एकूण ११ कोटी ८६ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४ कोटी २६ लाखाहून अधिक नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image