19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतला अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची पडझड झाली. सादिशा राजपक्षा याला वगळता श्रीलंकेच्या आघाडीच्या कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. सामन्यात ३३ षटकांचा खेळ झाल्यावर पावसाला सुरुवात झाल्यानं खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत श्रीलंकेनं ३३ षटकांमध्ये ७ गडी बाद ७४ धावा केल्या होत्या. भारताच्या विकी ओत्सवाल यानं ३, कौशल तांबे यानं २ तर रवी कुमार आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता. पावसामुळे थांबलेला खेळ अद्याप पुन्हा सुरु झालेला नाही.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image