पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज जालना इथं बातमीदारांशी बोलत होते. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत होती, त्यानुसार पाचवी पासून पुढच्या शाळा सुरु झाल्यानं  मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे, आणि या वयोगटातली कोरोना रुग्णसंख्या १ हजार ७११ नं  वाढल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचं मत असल्याचंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image