कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांना काळजीचं पत्र
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ चाचण्यांची साप्ताहिक संख्या कमी झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह काही राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या सणउत्सव, लग्नसमारंभ यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांनी मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटलं आहे. चाचण्यांच्या संख्येची पातळी कायम राखल्याशिवाय एखाद्या भौगोलिक परिसरात संसर्गाची पातळी नेमकी किती आहे, हे ओळखणे अवघड असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन चाचण्यांची संख्या ९७,५०२ होती. या उलट १७ ते २३ मे या आठवड्यात २ लाख ६८ हजार ५०१ एवढ्या सर्वोच्च चाचण्या झाल्या होत्या. अकोला, अमरावती,बुलढाणा,धुळे, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार,वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केलेल्या पातळीपेक्षा कमी चाचण्या २२ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात झाल्या असल्याचं सांगत आरोग्य सचिवांनी चिंता व्यक्त केली. वेळेवर निदान, संसर्गाची जोखमीची ठिकाणं तातडीनं ओळखून त्वरेनं उपाययोजना करण्यासाठी नियमित चाचण्या आवश्यक असल्याचं भूषण यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.