बालविवाह झालेल्या गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा राज्य महिला आयोगाचा इशारा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतरच्या काळात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे यापुढं बालविवाह होणाऱ्या गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. याबद्दलचा प्रस्ताव आयोगानं राज्य शासनाला सादर केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यावर त्या कुटुंबातून बालविवाह होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, हे विवाह रोखण्याची जबाबदारी त्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांची असून, ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले, तर त्यांना आपलं पद गमवावं लागेल असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.