रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जा रद्द, कोरोनापूर्वीचे तिकीटदरही लागू होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विशेष दर्जा समाप्त करणं आणि महामारीपूर्वीचे तिकीट दर बहाल करण्याचा आदेश रेल्वेनं तात्काळ प्रभावाने जारी केला आहे. रेल्वेगाड्यांची संख्या आता पूर्वीप्रमाणेच नियमित होईल, आणि महामारी पूर्वीचेच तिकीट दर लागू होतील, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर केवळ विशेष गाड्याच रेल्वेद्वारे चालवल्या जात होत्या त्याचे दर अधिक होते. लोकांनी विनाकारण प्रवास करु नये, म्हणून ही व्यवस्था केली होती. लांब पल्ल्याच्या आणि कमी पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विशेष रेल्वेगाड्या म्हणून चालवल्या जात होत्या.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image