राज्यात सुमारे २ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सुमारे २ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्या १ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल ४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या २६ हजार ८०० रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातले १ हजारापेक्षाही कमी रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर सुमारे २ लाख १० हजार व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. काल सर्वाधिक ६१५ रुग्ण मुंबई विभागात आढळले तर सर्वात कमी म्हणजे १३ रुग्णांची नोंद नागपूर विभागात झाली. एकट्या नगर जिल्ह्यात काल १० रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला नागपूर विभागात मात्र कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image