इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी,  कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं लसीकरण ग्राह्य धरलं जाणार नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर भारतानंही इंग्लंडमधून येणाऱ्या त्यांच्या नागरिकांवर हे बंधन घालायचा निर्णय घेतला आहे. नवे नियम इंग्लंडमधून येणाऱ्या त्यांच्या सर्व नागरिकांना लागू असतील. त्यांचं लसीकरण झालेलं असो किंवा नसो, प्रवासाच्या  आणि विमानतळावर उतरण्याच्या  ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी  करणं आणि इतर नियम  त्यांना लागू राहतील. भारतात उतरल्यानंतर  दहा दिवस विलगीकरण आणि आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image