राज्यात आज ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण आज पूर्ण झालं. राज्यात काल ४ हजार ५८० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ५ लाख २८ हजार ८५३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात कालपर्यंत ९ कोटी ५८ लाख ८ हजार ६२३ मात्रा लाभार्थांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यापैकी ६ कोटी ६० लाखांहून अधिक नागरिकांना पहिली मात्रा मिळाली असून ३ कोटी ६५ लाखाहून अधिक नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या एकशे दोन कोटी ९६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यापैकी ३१ कोटी २ लाख नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असून इतरांना पहिली मात्रा मिळाली आहे.  काल ६४ लाख ७५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image