दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा जम्मू- काश्मीरच्या तीन दिवसाच्या  दौऱ्यावर असून त्यांनी आज जम्मूमधल्या भगवती नगर इथं  सभेला संबोधित केलं. जम्मूमधल्या नागरिकांवर वर्षानुवर्षे अन्याय झाला. मात्र हा कालखंड आता संपला असल्याचं ते म्हणाले. विकासाच्या युगात आता कोणीही बाधा आणू शकणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी दिली. युवापिढी जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  प्रधानमंत्री मोदी यांनी काश्मीरमध्ये तळागाळाच्या स्तरापर्यंत लोकशाही स्थापित केली असून  मोदी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं ते म्हणाले. शहा यांनी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरच्या विकासासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image