देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घ्यावी अशी एक लोक चळवळ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं. स्वच्छ भारत शहरी अभियानाचा दुसरा टप्पा, अमृत अभियान 2 आणि शहर कायाकल्प आणि परिवर्तनासाठीच्या अटल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला; त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेलं योगदान अमुल्य आहे अशा शब्दात यावेळी मोदी यांनी सर्व स्वच्छता दुतांचा गौरव केला. गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदिप सिंग पुरी, जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image