आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तत्काळ तयार करा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, पनवेल मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर  महापालिकांसंदर्भात ३० सप्टेंबरला या संदर्भातला अध्यादेश जारी झाला आहे. या महानगरपालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी तिथं निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यासाठी मतदारयाद्या तयार करण्याची जबाबदारी  निवडणूक आयोगाची आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image