टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तान बरोबर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटाच्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. एकदिवसीय आणि टी- ट्वेंन्टी विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतानं आतापर्यंत पाकिस्तान विरुद्धचे सर्व सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचे एकदिवसीय सामने सात वेऴा तर टी-ट्वेंटीचे विश्वचषक सामने पाच वेळा झाले आहेत. या सर्व सामन्यांमधे भारतानच विजय मिळवला आहे. याही स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहील, असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बातमीदारांना सांगितलं. विश्वचषकातल्या सर्व सामन्यांचं धावतं वर्णन आकाशवाणीवरून प्रसारीत केलं जात आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.