विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य टिकवणं गरजेचं - आंतरधर्मीय परिषदेत सर्वधर्मीय नेत्यांमध्ये एकवाक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमधे सतत आणि सखोल संवाद होत राहिला पाहिजे, असं मत नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक नेत्यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत समूहानं त्यांच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही परिषद आयोजित केली आहे. धार्मिक बंधुभावापुढची जागतिक आव्हानं आणि भारताची भूमिका या विषयावर या परिषदेत चर्चा होत आहे. या एकदिवसीय परिषदेला पतंजली योगपिठाचे बाबा रामदेव, आचार्य लोकेश मुनी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशिअस, भिक्खू संघसेन, हाजी सैद सलमान चिश्ती आणि इतर अनेक धार्मिक नेते या परिषदेत सहभागी झाले आहेत.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image