प्रधानमंत्री २६ तारखेला आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधित करणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असून आपले विचार मांडण्यासाठी मोदींनी लोकांना आवाहन केलं आहे. नागरिक आपले विचार नमो अॅप किंवा mygov या मुक्त मंचावर मांडू शकतात. आपण आपला संदेश १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर देखील हिंदी आणि इंग्रजीमध्ये नोंदवू शकता. २४ सप्टेंबरपर्यंत हा दूरध्वनी क्रमांक सुरू राहील. १९२२ या क्रमांकावरही मिस्ड कॉल देऊन SMS मध्ये आलेल्या लिंकमार्फतही थेट पंतप्रधानांना आपल्या सूचना नागरिक देऊ शकतात.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.