५०० कोटी लिटर जलसाठा राखण्यासाठी जनसहभागातुन चळवळ कार्यरत
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणीटंचाईप्रवण क्षेत्रात लोकसहभागातून ५०० कोटी लिटर जलसाठा करण्यासाठीची चळवळ उभी राहिली आहे. भारतीय राजस्व सेवेतले सह आयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांनी २०१९ मधे ११ जणांना सोवत घेऊन जळगाव जिल्ह्यात ही चळवळ सुरु केली. लोकसहभागातून शेतातला गाळ उपसणं. बांध बंदिस्ती, पाणी प्रवाहांचं खोलीकरण अशी कामं करण्यात आली. त्यात काही स्वयंसेवी संस्थांनीही हातभार लावला. परिणामतः यंदा या भागात पाणीटंचाईचं संकट आलं नाही असं स्थानिकांनी सांगितलं. चाळीसगाव तालुक्यातल्या हिरापूर गावात काल या चळवळीचा भाग म्हणून जलफेरी काढण्यात आली. चळवळीत योगदान देणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. ही चळवळ उस्मानाबाद,औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यातही पोचली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.