५०० कोटी लिटर जलसाठा राखण्यासाठी जनसहभागातुन चळवळ कार्यरत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणीटंचाईप्रवण क्षेत्रात लोकसहभागातून ५०० कोटी लिटर जलसाठा करण्यासाठीची चळवळ उभी राहिली आहे. भारतीय राजस्व सेवेतले सह आयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांनी २०१९ मधे ११ जणांना सोवत घेऊन जळगाव जिल्ह्यात ही चळवळ सुरु केली. लोकसहभागातून शेतातला गाळ उपसणं. बांध बंदिस्ती, पाणी प्रवाहांचं खोलीकरण अशी कामं करण्यात आली. त्यात काही स्वयंसेवी संस्थांनीही हातभार लावला. परिणामतः यंदा या भागात पाणीटंचाईचं संकट आलं नाही असं स्थानिकांनी सांगितलं. चाळीसगाव तालुक्यातल्या हिरापूर गावात काल या चळवळीचा भाग म्हणून जलफेरी काढण्यात आली. चळवळीत योगदान देणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. ही चळवळ उस्मानाबाद,औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यातही पोचली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image